[Marathi] मुंबई मध्ये पाऊस सुरु राहणे अपेक्षित, मुंबईतील ४०० उड्डाणांवर चक्रीवादळ वायुचा प्रभाव

June 13, 2019 2:47 PM|

Cyclone Vayu: rain in Mumbai

मुंबईत पाऊस परतलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे.

पूर्व मॉन्सूनच्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट दिसून आलेली आहे.गेल्या २४ तासात, सांता करुज मध्ये १५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे तर कोळंब मध्ये १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

झालेल्या पावसाचे कारण आहे चक्रीवादळ वायु जे सध्या उत्तर/उत्तरपश्चिम दिशेत पुढे चालत आहे.सौराष्ट्र कोस्टच्या जवळून निघण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ महाराष्ट्राशी दूर जात आहे आणि दुर्बल होत आहे, तथापि भरपूर प्रमाणात आर्द्रता उपलब्ध असल्यामुळे मुंबई क्षेत्रामध्ये पुन्हा पाऊस परतण्याची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी पाऊस व गडगडाटी होण्याची शक्यता आहे.

सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे की मुंबई मध्ये मॉन्सूनचे लवकरच आगमन होईल. अशा प्रकारे, मुंबई मध्ये आठवड्याच्या शेवट पर्यंत मॉन्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.

मुंबईतील ४०० उड्डाणांवर चक्रीवादळ वायुचा प्रभाव

अतिशय तीव्र चक्रीवादळ वायूमुळे ४०० उड्डाणांवर प्रभाव पडलेला आहे. एका अधिकार्यानुसार, वाईट हवामानाच्या परिस्थितीमुळे बुधवारी १९४ फ्लाइट्सच्या टेक ऑफ मध्ये व १९२ फ्लाइट्सच्या लैंड मध्ये विलंब झाला आहेत. याशिवाय, २ फ्लाइटचा रूट वळविला गेला आहेत. मुंबईतून ९०० विमानांचे दैनिक प्रक्षेपण आहे.

अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीच्या समांतर होते, ज्यामुळे शहरात वाऱ्यांसह जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय, मुंबईच्या किनारपट्टी जवळ १२.५० फूट उंच लाटांची नोंद झाली.

तथापि, चक्रीवादळ वायु महाराष्ट्राशी आता दूर जाण्यामुळे आज पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात किंचित कमीच राहणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मुंबई पोलिस, तटरक्षक रक्षक आणि भारतीय नौदलला सावध राहिला सांगितले आहे. सर्व मच्छिमारांना समुद्रातून परत बोलवले गेले आहे. लोकांना समुद्रात प्रवेश न करण्याची सूचना केली आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

author image