[Marathi] २५ वर्षात पहिल्यांदा सर्वाधिक पाऊस आणि २०१९ मध्ये ९ चक्रीवादळं अनुभवल्यानंतर आयओडी निर्देशांक सामान्य पातळीवर

January 16, 2020 4:44 PM|

Monsoon

आयओडी (हिंद महासागर डायपोल) चा चमत्कारीक प्रवास अखेर संपुष्टात आला आहे, प्रमुख सागरीय मापदंड सामान्य पातळीवर आला आहे. सद्य स्थितीलाआयओडी निर्देशांक ०.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे.परंतु मान्सून हंगामातील चांगल्या पावसाबरोबर नेहमीच जोडल्या गेलेल्या आयओडीच्या या प्रवासात भारतीय मान्सूनच्या इतिहासात काही नोंदी आहेत.

पावसाच्या बाबतीत देशासाठी २०१९ हे अपवादात्मक वर्ष ठरले आहे. सर्वप्रथम १९७४ नंतर मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस झाला आणि त्यानंतर मान्सून नंतरचे नऊ चक्रीवादळं भारताच्या इतिहासातील नोंदविलेली सर्वाधिक चक्रीवादळं आहेत.

हंगामाची सुरुवात आशाजनक नव्हती परंतु हंगामची पुढे वाटचाल सुरु असताना चित्र पूर्णपणे बदलले. त्याचे श्रेय आयओडीला जाते, कारण मान्सून २०१९ चा हंगाम सुरुवातीला सामान्यपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तविला जात होता. अगदी अल निनोला ज्याची केवळ उपस्थिती संपूर्ण मॉन्सून हंगाम खराब करण्याची क्षमता ठेवते त्याला देखील निष्प्रभ केला.

खरं तर २०१९ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांत अल निनो निर्देशांक प्रबळ होता, ज्यामुळे मान्सूनपूर्व पर्जन्यमान कमकुवत राहिले, त्यानंतर जून महिन्यात मान्सूनला सुरूवात होण्यास विलंब आणि त्यानंतरच्या महिन्यात दुष्काळासारखी परिस्थिती ज्यात पाऊस केवळ ७७% इतका झाला होता.

आयओडी केवळ धन नव्हता तर इतिहासातील सर्वात प्रबळ होता. यामुळे मान्सूनचा हंगामात चांगलाच म्हणजे ११०% पाऊस झाला.

एप्रिलपासून आयओडी निर्देशांक धन दिशेस सामान्य च्या आसपास होता. तथापि, मे नंतर प्राबल्य वाढून पावसाळ्याच्या हंगामात निर्देशांक धनात्मक झाला. आकडेवारीनुसार, सर्वाधिक काळ म्हणजेच डिसेंबरपर्यंत राहिलेला व आयओडी निर्देशांक ०.४ अंश सेल्सिअसच्या उंबरठा मूल्याच्या वर कायम राहिलेला आहे. याशिवाय आयओडी निर्देशांक २.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता, जी आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे.

IOD

हवामानतज्ञांच्या अनुसार, या हंगामात आयओडी निर्देशांकात घट खूपच हळूहळू किंवा उशीरा झाली असेच म्हणायला हवे.

सामान्यत: नैऋत्य मान्सूनच्या परतीनंतर, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन (आयटीसीझेड), जो मुख्यत: मान्सून प्रणालीच्या मंथनासाठी जबाबदार असतो, दक्षिणेकडे दक्षिण गोलार्धाकडे जाऊ लागतो. त्याचबरोबर आयओडीलाही फारसे महत्त्व राहत नाही.

तथापि, यावर्षी अशी कोणतीही क्रिया घडली नाही. सक्रिय आयटीसीझेडसह आयओडीची उपस्थितीने मान्सूननंतरच्या काळात एका पाठोपाठ एक हवामान प्रणाली तयार करण्यासाठी हवामान अनुकूल ठेवले. केवळ समुद्रातील परिस्थिती अनुकूल नव्हती परंतु योग्य प्रमाणात पुरेशी होती ज्यामुळे जास्तीत जास्त प्रणालींनी चक्रीवादळ बनण्यापर्यंत मजल गाठली.

वर्षाकाठी भारतीय समुद्रात नऊ चक्रीवादळ नोंदविण्यात आले असून त्यात सहा समुद्र अरबी समुद्रात तर तीन बंगालच्या उपसागरात बनले आहेत. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची संख्या जास्त आहे.

आयओडी आणि नैऋत्य मान्सून २०२०

आयओडीच्या सद्यस्थितीकडे पाहता हवामान प्रारूपं असे सांगत आहेत की किमान जूनपर्यंत आयओडी निर्देशांक सामान्य राहील.

आता आपण मान्सूनच्या हंगामाकडे प्रगती करीत आहोत, तर पुन्हा सर्वांचे लक्ष आयओडीच्या विकासाकडे असेल. तथापि, हवामानतज्ञांचे मत आहे की, एका पाठोपाठ एक धन तसेच प्रबळ आयओडी इतिहासात आढळत नाही.

तथापि, सगळंच पुस्तकातील नियमांनुसार होत नाही, कोणास ठाऊक आगामी मान्सून २०२० मध्ये आणखी नवीन विक्रम निर्मिले जातील.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles

thumbnail image
March 20, Today Marks The Spring Equinox: Day-Night Duration Nearly Equal

The official transition from winter to spring, known as the SPRING EQUINOX, occurs today! It’s time when the Sun crosses the celestial equator precisely at 2:31 PM, delivering warmer, longer days to the Northern HemiSphere. As autumn arrives, the South enjoys colder evenings.

posted on:
thumbnail image
आज सूर्य करेगा भूमध्य रेखा पार, बसंत ऋतु की शुरुआत, दिन-रात की अवधि लगभग बराबर

आज, 20 मार्च 2025, बसंत विषुव (Spring Equinox 2025) का दिन है। सूर्य भूमध्य रेखा को पार करेगा, दिन बड़े और गर्म होंगे। उत्तर गोलार्ध में बसंत ऋतु की शुरुआत होगी, दक्षिण गोलार्ध में शरद ऋतु का आगमन होगा। वहीं, सितंबर में यह खगोलीय घटना फिर से होगी।

posted on:
thumbnail image
गर्मी का दायरा बढ़ा! ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना और रायलसीमा में 40°C के पार तापमान, राहत की उम्मीद

देश में समय से पहले गर्मी असर बढ़ रहा है। ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश में अभी तापमान से 40°C से ऊपर पहुंच गया है, जिस कारण इन राज्यों में भीषण गर्मी हो रही है। फरवरी 2025, पिछले 125 वर्षों में सबसे गर्म महीना रहा है। कई जगहों पर सामान्य से 6.4°C तक ज्यादा तापमान रिकॉर्ड हुआ है।

posted on:
thumbnail image
दिल्ली में बढ़ेगी गर्मी! शुष्क और तपता रहेगा वीकेंड, बारिश की संभावना हुई कम

दिल्ली में गर्मी बढ़ रही है, पिछले 3 दिनों में तापमान 4°C बढ़ा है। आज अधिकतम 34-35°C, न्यूनतम 17°C तक रह सकता है। मार्च अब तक लगभग शुष्क बना हुआ है, सिर्फ 2mm बारिश दर्ज हुई है। 26-28 मार्च को तापमान 40°C के करीब पहुंचने की संभावना है। वहीं,पश्चिमी विक्षोभ से मैदानी इलाकों में बारिश की संभावना नहीं है।

posted on: