[Marathi] दरड कोसळल्याने पुणे ते बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग ४ चे नुकसान

August 6, 2019 4:00 PM|

Pune banglore highway

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेजवळ सतत पडलेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळल्यानेराष्ट्रीय महामार्ग ४चे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जवळील शिरोळी येथे रस्ता खराब झालेला आहे. वास्तविक कोल्हापुरामध्ये गेले तीन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. दरड कोसळण्यामुळे ठिकठिकाणी रस्ता खचला असून वाहतुकीवर परिणाम होत आहे.

कोल्हापूरमध्ये ४ ऑगस्ट रोजी ५१ मिमी, तर ५ ऑगस्ट रोजी १०२ मिमी पावसाची नोंद झाली. तर गेल्या २४ तासांत १२८ मिमी इतक्या दमदार पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. येथे गेल्या २४ तासांत ५२ मिमी तर ४ ऑगस्ट रोजी ८५ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर कर्नाटकमधील धारवाड येथे ७४ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला आहे.

दररोजकोल्हापूरमार्गे बेळगाव ते पुणेजाणाऱ्या हजारो गाड्या या महामार्गावरून धावतात. आता, मान्सूनची लाट कर्नाटकच्या किनारी भागांत सक्रिय असल्याने अजून पुढील २४ ते ४८ तास या भागात पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल.

दरम्यान १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस पडला ज्यामुळे या भागांत पावसाचे आधिक्य झाले आहे.

Image Credits – WordPress.com

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles

thumbnail image
March 20, Today Marks The Spring Equinox: Day-Night Duration Nearly Equal

The official transition from winter to spring, known as the SPRING EQUINOX, occurs today! It’s time when the Sun crosses the celestial equator precisely at 2:31 PM, delivering warmer, longer days to the Northern HemiSphere. As autumn arrives, the South enjoys colder evenings.

posted on:
thumbnail image
आज सूर्य करेगा भूमध्य रेखा पार, बसंत ऋतु की शुरुआत, दिन-रात की अवधि लगभग बराबर

आज, 20 मार्च 2025, बसंत विषुव (Spring Equinox 2025) का दिन है। सूर्य भूमध्य रेखा को पार करेगा, दिन बड़े और गर्म होंगे। उत्तर गोलार्ध में बसंत ऋतु की शुरुआत होगी, दक्षिण गोलार्ध में शरद ऋतु का आगमन होगा। वहीं, सितंबर में यह खगोलीय घटना फिर से होगी।

posted on:
thumbnail image
गर्मी का दायरा बढ़ा! ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना और रायलसीमा में 40°C के पार तापमान, राहत की उम्मीद

देश में समय से पहले गर्मी असर बढ़ रहा है। ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश में अभी तापमान से 40°C से ऊपर पहुंच गया है, जिस कारण इन राज्यों में भीषण गर्मी हो रही है। फरवरी 2025, पिछले 125 वर्षों में सबसे गर्म महीना रहा है। कई जगहों पर सामान्य से 6.4°C तक ज्यादा तापमान रिकॉर्ड हुआ है।

posted on:
thumbnail image
दिल्ली में बढ़ेगी गर्मी! शुष्क और तपता रहेगा वीकेंड, बारिश की संभावना हुई कम

दिल्ली में गर्मी बढ़ रही है, पिछले 3 दिनों में तापमान 4°C बढ़ा है। आज अधिकतम 34-35°C, न्यूनतम 17°C तक रह सकता है। मार्च अब तक लगभग शुष्क बना हुआ है, सिर्फ 2mm बारिश दर्ज हुई है। 26-28 मार्च को तापमान 40°C के करीब पहुंचने की संभावना है। वहीं,पश्चिमी विक्षोभ से मैदानी इलाकों में बारिश की संभावना नहीं है।

posted on: